Share

बँकेच्या खासगीकरणाबाबत निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: बँकिंग क्षेत्राच्या खासगीकरणामुळे शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील,असे बोलले जात आहे.  तर जास्तीत जास्त निर्गुंतवणुकीतून पैसा उभारण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी बँकांना खासगी क्षेत्राकडे सोपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयविरोधारात सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी दोन दिवसांच्या देशव्यापी संपावर होते. ९ राज्य बॅंकांच्या संघटना, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सोमवारी आणि मंगळवारी संपाची घोषणा केली होती.

देशाच्या बँकेने पुकारलेल्या संपाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, बँका आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात याची जाण केंद्राला असून, देशातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले आहे.

शिवाय ज्या राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण होईल त्या बँकांच्या कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क आणि फायदे अबाधित राहण्याची दक्षता घेण्यात येईल. तसेच त्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतनाच्या लाभांत बँक खासगीकरणानंतर कोणताही फरक पडणार नसल्याचे आश्वासन ही अर्थमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचे दिले आहे. यादरम्यान, केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मदत करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिटय़ूशनच्या (डीएफआय) स्थापनेला मंजुरी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!