🕒 1 min read
मुंबई: ठाकरे सरकारची अवस्था अत्यंत डगमगीत स्थितीसारखी झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर सेनेला जशी गळतीच लागली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ५० आमदारांचा गट तयार झाला आहे. तर आता सेनेकडे फक्त १५ आमदारांचा पाठींबा आणि साथ आहे. यावरूनच भाजपकडून सतत सेनेला टार्गेट केले जात आहे. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“ठाकरे सरकारची या दोन शब्दांनी वाट लावली “नॉट रिचेबल” अगोदर सीएम नॉट रिचेबल आता आमदार नॉट रिचेबल.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडील आकडा हा महाविकास आघाडीचीही धडधड वाढवत आहे. शिंदेंच्या बंडानंतर मविआ सरकारही अडचणीत सापडले आहे.
ठाकरे सरकारची या दोन शब्दांनी वाट लावली "नॉट रिचेबल"
अगोदर सीएम नॉट रिचेबल आता आमदार नॉट रिचेबल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 24, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ला रामराम ठोकला आहे. तर शिंदेंसह आमदारांनी आसाममध्ये तळ ठोकला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Hemangi Kavi : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर हेमांगी कवीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…
- Devendra fadanvis : बंडापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा?
- “विराट कोहली शानदार खेळीसह कमबॅक करेल”, बालपणीच्या प्रशिक्षकांची भविष्यवाणी!
- TNPL 2022 : मुरली विजय करतोय कमबॅक! म्हणाला, “मला शक्य तितके..”
- Bhaskar Jadhav : ‘नॉट रिचेबल’ असणारे भास्कर जाधव चिपळूणमध्येच; सेनेत राहण्याच्या निर्णयावर ठाम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
