Share

Nilesh Rane | भास्कर जाधव बिनकामाचा बैल तर जयंत पाटलांचा हवेत गोळीबार – निलेश राणेंची टीकेची तोफ

Published On: 

Nilesh Rane | मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधक सतत सत्ताधारकांवर आरोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे. तर याच कारणामुळे काही दिवसांपुर्वीच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

यादरम्यान, भास्कर जाधवांना ( Bhaskar Jadhav ) कोकणात बिनकामाचा बैल म्हणतात, ते एक कार्टून आहेत आम्ही त्यांना बैल म्हणतो असं म्हणत येत्या सोमवारी चिपळूण मध्ये सभा घेऊन भास्कर जाधव यांची पोलखोल करणार, असा इशारा निलेश राणेंनी ( Nilesh Rane ) दिला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार चांगलं काम करतं आहे, कोण खुश कोण ना खुश यावर राष्ट्रवादीचे लक्ष आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस बेरोजगार झाली का? सतत सरकारच्या कामावर बोलणं योग्य नाही, जयंत पाटील काहीही बोलत असतात, हवेत गोळीबार करत असतात, असं निलेश राणे म्हणाले.

सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावानं, विरोधी पक्षात असताना कधी न्यायालयाच्या नावानं, कधी निवडणूक आयोगाच्या नावानं उद्धव ठाकरे रडतात. उद्या अंधेरीत पराभूत झाला तर अंधेरीच्या जनतेच्या नावानं रडतील त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ही रडकी सेना आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!