मुंबई: तारकर्ली येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच निलेश राणे यांची या पार्श्वभूमीवरील ट्वीटर पोस्ट सध्या चर्चेत असल्याचे दिसू येत आहे.
“मालवण, तारकर्ली, देवबाग ही नावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात १ व्हेंटिलेटर नाही. आज २ पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तरी दोघांचे प्राण वाचले असते. त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने एकाचा जीव वाचला.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
मालवण, तारकर्ली, देवबाग ही नावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात १ व्हेंटिलेटर नाही. आज २ पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तरी दोघांचे प्राण वाचले असते. त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने एकाचा जीव वाचला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 24, 2022
दरम्यान आकाश भास्करराव देशमुख आणि डॉ. स्वप्निल मारुती पिसे या दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बोट किनाऱ्याजवळ येत असताना लाटांच्या तडाख्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर यावरूनच भाजपने मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून…”, निलेश राणेंचा टोला
- देवेंद्र फडणवीसांच्या ‘जलआक्रोश’ मोर्चावर सचिन सावंत यांची टीका; गुजरातचा हवाला देत म्हणाले…
- “…या पायंड्याला पंतप्रधान मोदींनी विरोध करायला हवा”, संजय राऊतांची मागणी
- राजीव गांधींच्या खुन्यांचा सन्मान करून एम. के. स्टॅलिन यांनी काय साध्य केले?; ‘शिवसेने’चा सवाल
- IPL 2022 GT vs RR Qualifier 1 : गुजरात फायनलमध्ये..! मिलरच्या ‘किलर’ खेळीमुळं राजस्थानला पराभवाचा धक्का


