मुंबई : कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने यश मिळविले आहे.
नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ‘ इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२० ‘ हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला असून यामध्ये तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आले आहे. राज्याने २०१९ मध्ये असलेल्या तिसऱ्या क्रमांकावरून २०२० मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारसाठी हे खूप मोठे यश आहे. कोरोना काळात महाराष्ट्राची ही उपलब्धी महत्वाची आहे. काही लोकांनी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची सुपारी घेतली होती आणि नीती आयोगाचा हा अहवाल त्यांचा प्रयत्नांना चपराक आहे असे प्रतिपादन महेश तपासे, मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवले दुबईत साजरा करणार भारतीय प्रजासत्ताक दिन
- अभिमानास्पद ! राज्यातील ५७ शूर पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान
- ‘जीएसटी’तील तरतुदींविरोधात कर सल्लागारांचा देशव्यापी एल्गार
- ‘शेतकरी मोर्चाला पब्लिसिटी स्टंट म्हणत शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आठवलेंनी माफी मागावी’
- मोर्चात खरे शेतकरी कमी आणि मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त होते; दरेकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

