🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशला हरवत टीम इंडियाने सेमिफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. टीम इंडियाने बांग्लादेशचा २८ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे बांग्लादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे .
विजयासाठी ३१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला सर्वबाद २८६ धावा करता आल्या. बांग्लादेशकडूनशकीब अल हसन ६६ , शब्बीर रहमान ३६ आणि शेवटी मोहम्मद सैफुद्दीनने नाबाद ५१ धावांची खेळी केली तर भारताकडून जसप्रीत बुमराहने ४ तर हार्दिक पंड्याने ३ गडी बाद केले. तसेच शमी, भुवनेश्वर आणि चहलने एक-एक फलंदाजाला माघारी पाठवले.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहोत शर्माच्या १०४ आणि लोकेश राहुल ७७ आणि ऋषभ पंतच्या ४८ धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात ९ बाद ३१४ धावा केल्या. बांग्लादेशकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या
दरम्यान, टीम इंडियाचे ८ सामन्यांमधून १३ गुण आहेत. शिवाय अजून एक सामना बाकी आहे. टीम इंडियाला पुढील सामना जिंकून पहिल्या स्थानावर येण्याचीही संधी आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
