Share

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत होणारी चौकशी ही सुडबुद्धीने नाही- राष्ट्रवादी

Published On: 

मुंबई  – जलयुक्त शिवार योजनेवर एसआयटीची चौकशी लावली ही सुबुद्धीने नाही तर कॅग’च्या अहवालानुसार नेमण्यात आली असून भाजपाने खोटारडेपणा करु नये अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.महेश तपासे यांनी भाजपकडून एसआयटी आणि कोरोना अंमलबजावणीवरुन महाविकास आघाडीवर होणाऱ्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला.

भाजपाची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. या योजनेमुळे महाराष्ट्रातील मोठा भाग टॅकरमुक्त होईल असे मोठे दावे केले होते. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातबाजी केली मात्र कॅगने या योजनेवर ताशेरे मारल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

या योजनेत एकूण २२ हजार ५६८ गावे व ६ लाख कामांचा समावेश होता आणि त्यासाठी ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च झाला आहे. ज्याप्रमाणे सांगण्यात आले होते तेवढी भूजल पातळी वाढली नाही. उलट टँकरमुक्त होण्याऐवजी टँकरची संख्या वाढल्याचे समोर आले. या सगळ्या प्रकरणाचे सत्य बाहेर आले पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे कॅगने मारलेल्या ताशेरे यावर ही एसआयटी नेमण्यात आल्याचे तपासे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!