Share

भाजपच्या खटारा गाडीत अनेक जणं कोंबले जातायत, धनंजय मुंडेंचा भाजपला टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधारी भाजप आज पूर्णपणे भ्रष्टाचारात बरबटलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही. भाजपच्या खटारा गाडीत अनेक जणं कोंबले जात आहे. महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारे भाजप स्वतःच राष्ट्रवादी‘युक्त’ होऊन बसले आहे, असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान भोकरदन येथे आयोजित सभेत मुंडे बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठकारे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, तेव्हा भाजपच्या भल्याभल्यांची टरकायची. त्यामुळेच राज ठाकरे यांना आज ईडीची नोटीस बजावली आहे. भाजपविरोधात आवाज केला तर आवाज दाबला जातोय. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्याला देशात लोकशाही जिवंत आहे की नाही? असा प्रश्न पडत असल्याचं, धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

भोकरदन येथे बोलताना मुंडे यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि जालना मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर देखील निशाणा साधला, दानवे यांना जनतेने अनेकवेळा संधी दिली. त्यांच्या मुलाला आमदारकी दिली पण ‘खाऊ’साहेब दानवेंनी नेहमी ‘चकवाच’ दिला. मुख्यमंत्र्यांसारखेच दबावतंत्र दानवे वापरत आहे. आपल्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले जात आहेत. येत्या निवडणुकीत यांना निवडून न देता चकवा देऊयात, असे आवाहन मुंडे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!