Share

‘देवेंद्र फडणवीसजी तुम्ही कितीही प्रयत्न करा…आघाडीत बिघाडी काही होत नाही’

Published On: 

मुंबई  – मागील वर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार स्थापन केलं होतं. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार शरद पवार हेच होते, असं खळबळजनक विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

फडणवीस यांनी केलेला दावा राष्ट्रवादीने फेटाळून लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचे वक्तव्य करून आघाडीत गैरसमज पसरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी बिघाडी काही होणार नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.

शरद पवार हेच पहाटेच्या सरकारचे सूत्रधार असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर महेश तपासे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.भाजप सरकार आले नाही म्हणून आलेल्या आघाडी सरकारमध्ये बिघाडी कशी होईल ही खोड काही देवेंद्र फडणवीस यांची गेलेली दिसत नाही. त्यांनी कितीही चुकीची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी बिघाडी होत नाही हे लक्षात ठेवावे.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यामध्ये आदरणीय खासदार शरद पवारसाहेब यांचा हात होता हे जनतेलाही माहीत आहे याची आठवणही महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करुन दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!