🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : नवाब मलिक हे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. विधानसभेचे नियम जगजाहीर आहेत. मात्र आमदारांना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले. ही सरकारची नियोजनशून्यता आहे. कामकाज सल्लागार समिती तारांकित प्रश्नांपासून आमदारांना रोखण्यासाठी नव्हती, असे राम कदम म्हणाले होते.
राष्ट्रवादीचे नेते @nawabmalikncp महाराष्ट्राची दिशाफ़ुल करत आहेत . विधानसभेचे नियम जगजाहिर आहेत . आमदारना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले . ही सरकारची नियोजन शून्यता . आणि bac तारांकित प्रश्नांपासून आमदारना रोखण्यासाठी नव्हती . https://t.co/B2MBtKE96A pic.twitter.com/gkpFNSAYY6
— Ram Kadam (@ramkadam) December 13, 2019
भाजप नेते राम कदम यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते व आमदार नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. मलिक म्हणाले, ‘आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्यं करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत, असा टोला आमदार नवाब मलिक यांनी लगावला.
तसेच पुढे बोलताना मलिक म्हणाले, कावीळ झालेल्या व्यक्तीला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था भाजपचे आमदार राम कदम यांची झालेली दिसते, असे मलिक म्हणाले.
तसेच कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला आपल्या पक्षाचे विरोधी पक्षनेते श्री. @Dev_Fadnavis यांनीही मान्यता दिली आहे. कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते. (2/2)
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 13, 2019
दरम्यान, भाजपला याची माहिती नाही किंवा खोटा प्रचार करण्याचा त्यांचा अजेंडा आहे, असा आरोप मलिक यांनी केली. आता या व्यक्तव्यावरून भाजप नेते राम कदम आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यात वादाची ठीणगी पडली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205697386846117888?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
