टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी ह्ल्यानंतर देखील भाजपकडून निवडणूक प्रचार केला जात आहे. या हल्याचा राजकीय फायदा उठवण्याच काम भाजपकडून केलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. जवानांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
शिवसेना – भाजप युतीवर टीका करताना नवाब मलिक यांनी सेनेवर निशाना साधला आहे. भाजप हे शहिदांच्या टाळूवरच लोणी खातेय म्हणत शिवसेनेकडून टीका करण्यात आली. कालपर्यंत उद्धव ठाकरे चौकीदार चोर सांगत होते . मग आता युतीची बोलणी करून तुम्ही ‘चोरावर मोर’ आहात का, याच उत्तर देण्याचं आवाहन देखील मलिक यांनी केलं आहे.
दरम्यान, आज शिवसेना भाजप युती होणार हे निश्चित झाले आहे. आज संध्याकाळी भाजप अध्यक्ष अमित शहा हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली जाणार असल्याचं सांगितल जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

