Share

सोनिया गांधींना चार पानी पत्र लिहीत नवज्योत सिंग सिद्धूंचा काँग्रेसवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

पंजाब : पंजाब काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच चिघळत चालले आहे. पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे आणि नंतर परत येणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी आता पत्र लिहून नवीन मागणी केली आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली असून त्यांना पत्रही लिहिले आहे.

पत्रामध्ये सिद्धू यांनी १३ मुद्द्यांकडे लक्ष वेधले असून यापैकी १२ मुद्दे हे ड्रग्ज, कृषी, वीज, सरकार आणि वीज कंपन्या यांच्यातील करार रद्द करणं तसेच इतर काही गोष्टींमध्ये न्याय मिळावा असे आहेत. मागासवर्गीयांचा विकास, रोजगार, सिंगल विंडो सिस्टिम, महिला आणि तरुणांचे सबलीकरण, दारु आणि अवैध खाणकाम याविरोधात कारवाई यावरही त्यांनी पत्रामार्फत लक्ष वेधले आहे.

दरम्यान, सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे पत्र लिहिले असून मागील काही दिवसात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे प्रभारी हरीश रावत आणि पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली होती. तसेच आपल्या समस्याही त्यांनी पक्षासमोर मांडल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!