मुंबई : ‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. ते पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलत होते.
चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी देखील सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘याच मोदी सरकारने देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणचा किताब दिला आहे. याचा अर्थ मोदी सरकारला कळत नाही.’ असा पलटवार त्यांनी केला.
यासोबतच, ‘गेले अनेक वर्ष नरेंद्र मोदी सांगतात, मी शरद पवार यांचा सल्ला अनेकदा घेत असतो. ते काय त्यांची राजकारणातील उंची कमी असल्यामुळे? असं म्हणत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा ताळतंत्र सुटला असल्याची घणाघाती टीका केली आहे. ‘ते पातळी सोडून टीका करतायत. शरद पवार हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांना सद्याच्या काळातील भीष्मपितामह म्हणतो’ असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भाजपने बिहारमध्ये ‘लव्ह जिहाद’बाबत कायदा आणावा मग आम्ही बोलू : संजय राऊत
- शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू : हसन मुश्रीफ
- ‘चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे खुळ्यासारखं बडबडत आहेत’
- महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला! जवान संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप
- ‘तोरबाज’ चित्रपटात संजय दत्त दिसणार ‘मसीहा’च्या भूमिकेत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

