🕒 1 min read
बारामती:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’चे स्पष्ट संकेत दिले असतानाच माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात येत आहेत. तोच धागा पकडून राणे यांनी राज्यातील सत्तांतरावर भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत. सरकार गतीमान आहे, असे कुठे दिसत नाही. प्रगत राहिलेला महाराष्ट्र आज सर्वच बाबतीत मागे चालला आहे. त्यामुळेच हे सरकार राज्यात राहू नये, अशी माझी मनापासून प्रार्थना आहे. अमित शहा यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं होतं.
दरम्यान राणे यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. नारायण राणेंच्या वक्तव्याकडे त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल’
- आता एसबीआयचे रुपे जनधन कार्ड घ्या आणि मिळावा 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ
- टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुबमन गिल आऊट
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’

