नागपूर: काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील केंद्रीय संस्थांच्या कारवाईच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र सरकारचा उद्देश भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा उद्देश असेल, तर याला कॉंग्रेसचा पाठिंबा असेल, असं नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले, केंद्र सरकारचा उद्देश भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा उद्देश असेल, तर जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण फक्त भाजपात नसतील ते भ्रष्टाचारी असं सुरू आहे. विरोधात असतील, मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत असतील त्यांच्यावर कारवाई करायचं षडयंत्र भाजपा केंद्रात बसून करत आहे. हे चुकीचं आहे. म्हणून भाजपाने आधी आपली घरं तपासली पाहिजे, असं पटोले म्हणाले.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, जर भ्रष्टाचारावर कारवाई करायची असेल तर संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्या आधी सुरुवात नितीन गडकरी यांच्या घरापासून केली पाहिजे. कारण त्यांच्या कंपन्या नकली होत्या हे त्यावेळी सिद्ध झालं होतं, असे आवाहन नाना पटोले यांनी केंद्र सरकारला केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: सुरेश रैना पुन्हा ‘या’ संघात जाणार ?
- Lakhimpur Kheri violence : शेतकर्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला मिळाला जामीन
- अमरावती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सोमवारपर्यंत काम बंद आंदोलन
- ‘किंग’ बनायचयं, ‘किंग मेकर’ नाही; शिवतीर्थ’वरील बैठकीनंतर मनसेची भूमिका
- Uttarakhand election 2022 : काँग्रेसने उत्तराखंडमधील जनतेला वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित ठेवले- नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

