Share

छगन भुजबळ यांनाच फक्त आत टाकले, बाकीच्यांना का नाही?- नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

पुणे- सत्तेत आल्यानंतर सगळ्यांना आत टाकू असे वाटले होते.पण  छगन भुजबळ यांनाच फक्त आत टाकले. बाकीच्यांना का नाही. याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी करून ‘भुजबळ एकटेच आहेत का?’ असा सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी उपस्थित केला ते वसंतदादा सेवा संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात पटोले बोलत होते.

लोकप्रतिनिधी असल्याने मी जनतेच्या समस्या, अडचणींना वाचा फोडतो. आपल्या देशातील परिस्थिती बिकट आहे. जो आवाज उठवतो, त्याला मारले जात आहे. बेरोजगारी, नियोजनशून्य कारभार यातून समस्या वाढत आहेत. अवैध संपत्तीचा आरोप असलेले छगन भुजबळ हे एकमेव आहेत का? केवळ महात्मा फुलेंचे वंशज म्हणून त्यांना वेगळा न्याय लावला जात असेल, तर त्यावर आवाज उठवलाच पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!