Share

‘आंदोलकांना अडवायला खिळे ठोकणे हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं’

Published On: 

🕒 1 min read

पुणे:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.

२६ जानेवारीला झालेल्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनावर अनेक गंभीर प्रश्न उठवले गेले. तर, या घटनेनंतर पुन्हा होणारा संघर्ष टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर रोडवर टोकदार खिळे ठोकले होते. खिळे रोवल्याचे फोटो आणि व्हिडीओ संपूर्ण देशात व्हायरल झाले. यानंतर, विरोधकांसह नागरिकांनी देखील या कृत्यावरून दिल्ली पोलीस व केंद्र सरकार यांच्यावर सडकून टीका केली होती.

दरम्यान, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत असं कधीच घडलं नाही. आंदोलक रस्त्यावर येऊ नये यासाठी खिळे ठोकू नये. सरकारने ही टोकाची भूमिका घेतली आहे. देशाचा अन्नदाता रस्त्यावर बसलेला असताना त्यांच्याशी सवांद साधायला पाहिजे. या आंदोलनाबद्दल भारतात सहानभूती तर होतीच, आता दुसऱ्या देशांमध्येही ती सहानभूती पाहायला मिळतेय. हे सरकारसाठी फारसं चांगलं नाहीय. आपल्या राज्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलन गांभीर्याने घेतलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!