मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. मुंबईकरांची लाईफलाईन असणारी मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातही ज्यांनी लस घेवून १५ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना हा प्रवास करता येणार आहे. यासाठी एक अॅप देखील असणार आहे त्यावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात देखील हा पास मिळणार आहे.
दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याकरिता ओळखपत्र देण्यासाठी अॅप तयार करण्यात येत आहे. त्यानंतर महापालिकेच्या विभाग कार्यालयांबरोबरच ६५ रेल्वे स्थानकांवर हे ओळखपत्र दिले जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने क्युआर कोडचे ओळखपत्र संबंधित प्रवाशांना मिळेल अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी सांगितले.
यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी समन्वय सुरु असून ओळखपत्र देण्यासाठी येत्या दोन दिवसांत हे ॲप तयार होणार आहे. या ॲपवरून क्युआर कोड मिळाल्यानंतर प्रवाशांना लोकलचे तिकीट अथवा पास मिळणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारची टास्क फोर्स, पालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वय असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पावसाअभावी मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा धोका; बळीराजा चिंतेत!
- ‘ओ सरकार आता बास झालं…’; पुरबाधित शिये गावच्या गावकऱ्यांची पंचगंगेत उडी
- ‘जनआर्शिवाद’ यात्रेसाठी निघालेल्या डॉ. भागवत कराडांना बीड जिल्ह्यामध्ये ‘नो एन्ट्री’?
- ‘या’ कारणासाठी घेतली अभिमन्यू पवारांनी गडकरींची भेट
- महाराष्ट्रात सिने स्टाईल अमली पदार्थांची तस्करी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
