Share

राज्यपालांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले; मुंबई मनपातील आश्रय योजनेच्या चौकशीचे दिले आदेश

Published On: 

मुंबई : मुंबई महापालिकेत आश्रय योजनेत घाटाळा झाल्याची तक्रार भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे केली होती. याप्रकरणी राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. हा शिवसेनेला मोठा धक्का समजला जात असून राज्यपाल आणि शिवसेना यांच्यातील वाद यानिमित्ताने पुन्हा उफळून आल्याची चर्चा आहे.

यापूर्वी राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरुन ठाकरे सरकारवर तोशोरे ओढले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकमेकांवर केलेले ‘लेटर वॉर’ हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. आता राज्यपालांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्याने हा शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा (MLA Mihir Kotecha) आणि काही नगरसेवकांनी केला होता. भाजपच्या शिष्टमंडळाने याबाबत राज्यपालांना भेटून चौकशी करण्याची मागणी केली होती. आश्रय योजनेतंर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्यात येणार आहेत.

सफाई कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आश्रय योजनेत आतापर्यंत १ हजार ८४४ कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होत असताना भाजपने त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!