Share

तुती रेशीम पिकाला आता कृषी पीक म्हणून मान्यता; विमा, कर्ज, भरपाई, अनुदानाचे लाभ मिळणार

Published On: 

औरंगाबाद:  महाराष्ट्र सरकारने कृषी पीक म्हणून तुती रेशीम पिकाला मान्यता दिली अाहे. या  संदर्भात कृषी व पशुसंवर्धन विभागाने जीआर  काढला आहे. तुती रेशीमला कृषी पिकाचा दर्जा मिळाल्यामुळे रेशीम शेती करणाऱ्यांना अाता कृषी क्षेत्रासाठी लागू सर्व योजनांचा लाभ मिळणार अाहे. राज्यातील २७ जिल्ह्यांत तुती रेशीमची शेती केली जाते. या सर्व शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल.

राज्यात तुती व टसर (वन्य) अशा २ प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतले जाते. सहकार व पणन विभागाकडून कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील तरतुदीनुसार तुतीचा शेती उपजाच्या अनुसूचित समावेश करण्यास मान्यता मिळाली. नियोजन विभागाने तुतीला वृक्षाचा दर्जा दिला अाहे. कृषी विद्यापीठांत रेशीम किडे शास्त्राचा समावेश असून हा विषय व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून शिकवला जात अाहे. तुती रेशीम हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून समोर येत अाहे.

तुती लागवड शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी फायदेशीर ठरत अाहे. मात्र तुती लागवड व रेशीम उद्योगाचा समावेश वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत होता. त्यामुळे शेतीच्या विविध योजनांचा लाभ मिळत नव्हता. तुती रेशीमचा समावेश कृषी पिकांत झाल्याने हे सर्व लाभ शेतकऱ्यांना मिळणार अाहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!