मुंबई: बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटलाच नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली. प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
मात्र, परीक्षेत पेपर फुटीचे प्रकार समोर आले आहेत या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलकांनी केली. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन धारावी पोलीस स्टेशनला नेलं असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
जलयुक्त घोटाळा प्रकरण उघड; निलंबनानंतर आता थेट अधिकाऱ्यांना अटक!
“पंडित राहुल गांधी देशात मुस्लीम अजेंडा रेटण्याचा जोरदार प्रयत्न करताय”, भातखळकरांचा आरोप
…त्यामुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडले- राजनाथ सिंह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

