🕒 1 min read
बीड : केंद्र आणि राज्य सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामध्ये काही फारसा फरक नाही. कारण केंद्र सरकारने पश्चिम महाराष्ट्रात जूनमध्ये महापूर झाला, पाहणी करायला आता पथक पाठवले. मराठवाड्यातील पूर परिस्थिती पाहण्यासाठी तर मार्च-एप्रिलमध्ये पथक पाठवतील सध्या अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था झालेली आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
राजू शेट्टी यांनी बीडमधील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावरती आहोत जर राज्य सरकारने मदत केली नाही, तर शेतकरी उद्या मानगुटीवर बसेल, असा इशारा राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी दिला.
‘बांधावरती पाहणी करण्यासाठी सुद्धा काही शिल्लक राहिलेला नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तर विमा कंपन्यांनी मात्र प्रचंड बदमाशी केली विमा कंपनी खोट रेकॉर्ड तयार करत आहे. या संदर्भात पुरावे आमच्याकडे आहेत. क्रॉप कटिंगचा रिपोर्ट सरळ-सरळ खोटा दिलेला आहे असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ एकत्र या’, यशोमती ठाकूर यांचे आवाहन
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- ‘शेतकऱ्यांनी वरुण गांधींचे अभिनंदन करायला हवे’, संजय राऊतांनी केले कौतूक
- ‘अन्नदात्यांचे ऋण फेडण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा’, शिवसेनेचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
