🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मोदींवर टीका केली आहे, स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदींना देश कधीही माफ करणार नाही. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही.#RajivGandhi
— Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2019
दरम्यान, वडिलांबद्दलच्या विधानाने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी देखील नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटकरत आता युद्ध संपले असून मोदींचे कर्म त्यांची वाट पाहता आहेत, असा घणाघात केला आहे. मोदी यांनी माझ्या वडीलांमध्ये आणले तरी ते आता वाचू शकणार नाहीत, असा इशारा राहुल यांनी दिला आहे.
Modi Ji,
The battle is over. Your Karma awaits you. Projecting your inner beliefs about yourself onto my father won’t protect you.
All my love and a huge hug.
Rahul
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

