औरंगाबाद : थकीत बिल वसुलीसाठी महावितरण थकबाकीदारांचे वीज कपात आहे. त्यात खुलताबाद मधील काही शेतकऱ्यांची वीज कापल्याने मनसेने महावितरण अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठत त्यांना खडसवत चांगलाच जाब विचारला. यावेळी शेतकऱ्यांनी वसुली शिवाय प्रलंबित कामाचा पाढा देखील वाचला. त्यावर महावितरण अधिकारी मात्र, मुग गिळूण गप्प होते.
सर्व डीपी बंद करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, राज ठाकरे यांनी उर्जा मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याचे सांगितले होते. डीपी सुरु करण्यासाठी जाब विचारण्यात आला, तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या विजे संबंधित समस्या महावितरण ने सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुहास दाशरथे यांनी दिला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे , तालुका अध्यक्ष अविराज निकम, शैलेश क्षीरसागर, राजू खरे गजन गौडा पाटील संदीप कुलकर्णी, खुलताबाद शहर अध्यक्ष बाबासाहेब फुलारे, शेतकरी यावेळी उपस्थित होते
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर केवळ राज्यपालांना विमान नाकारणं अहंकार कसा होऊ शकतो’
- ईव्हीएम वरून अजितदादा आणि नाना पटोलेंमध्ये मतभेद; खुद्द पटोलेंनी दिली कबुली
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारचे निर्बंध ! वाचा कशी आहे नियमावली
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
