Share

पाकिस्तानला विरोध भाषणातचं, महाराष्ट्रात पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: कलम ३७० तर इतर कारणांमुळे भारत व पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. मोदी सरकारच्या कलम ३७० हटवण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. एका बाजूला सत्तेतील मंत्री पाकिस्तान विरोधात भाषणे करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या ‘एमएमटीसी’कडून पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली आहे. पाकिस्तानी कांदा राज्यात आल्यास स्थानिक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. दिवसांपूर्वीच एमएमटीसीकडून इजिप्त, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून कांदा आयातीसाठी निविदा काढण्यात आली होती.

६ सप्टेंबर रोजी एमएमटीसीकडून काढण्यात आलेल्या निविदेत नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कांदा हवा असल्याचे म्हंटले आहे. या दरम्यानचं राज्यातील खरीपाचा कांदा बाजारात येतो, त्यामुळे आयात कांदा बाजारपेठेत आल्यास दर कोसळू शकतात.

कांदा आयातीच्या निर्णयावर टीका करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला धारेवर धरले आहे. खरीपाचा कांदा काढणी महिन्याभरावर आली आहे. अशावेळी पाकिस्तानमधून कांदा आयात करण्याची काय घाई आहे? भारतीय शेतकरी हे आपले शत्रू आहेत का ? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!