Share

‘मुख्यमंत्र्यांनी राजकारण करु नये ‘हा’ सल्ला पहिल्यांदा सामना संपादकांना द्यावा’

Published On: 

मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. तर दुसरीकडे ही राजकारणाची वेळ नाही असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी राजकारण करु नये हा सल्ला पहिल्यांदा सामना संपादकांना द्यावा,’ असा खोचक सल्ला भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला आहे.

पुढे ते म्हणतात, ‘महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढते, मृतांची संख्या वाढतेय. त्यामुळे जनतेत जाऊन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला तर चांगले होईल, आपल्या सहकाऱ्याच्या नथीतून तीर मारावे हे उद्योग बंद करावेत,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. ट्विट करत शेलार म्हणतात, ‘आपण फेसबुकवरुन राजकारण करु नका, असा जो उपदेश केलात तो सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना केलात तर बरं होईल,’ असा सल्ला शेलार यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!