मुंबई : महानगरपालिकेच्या स्थापत्य समितीच्या बैठकीत विविध संवर्गातील १०५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा आणि विविध संवर्गातील २७ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मंजूर न होण्यामागे आर्थिक गैरव्यवहार आहे का, असा सवाल भाजपा आमदार अमित साटम यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून विचारला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, हा अभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात मंजूर करण्यात आला. त्यानंतर सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी महापालिका सभागृहासमोर तातडीचे कामकाज म्हणून मांडण्यात आला होता. परंतु दोनवेळा महापालिका सभागृह बोलावून ते रद्द करण्यात आले. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होण्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तविली जात असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते मिळून अभियंत्यांना त्यांच्या हक्काच्या बढती तथा पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आमदार साटम म्हणतात, कोविड काळात या सर्व अभियंत्यांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. कोविड सेंटरची उभारणी असो किंवा इतर कोविडच्या उपाययोजनांची अंमलबजावणी असो, अभियंते रस्त्यावर उतरून काम करत होते. काही अभियंत्यांना यादरम्यान जीव गमवावे लागले. शिरीष दीक्षित, अशोक खैरनार हे अधिकारी कोरोनाचे बळी ठरले. त्यामुळे या अभियंत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचा गौरव करण्याऐवजी त्यांना पदोन्नती किंवा बढतीपासून रोखून एकप्रकारे त्यांचा अपमान पालिका करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंदनाचा पाट आणि सोन्याचं ताट दिलं, पण ताटात काहीच नाही मग खायचं काय?’
- ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील सातवा शिलेदार ‘नीरज चोप्रा’
- ईडीचा धडाका सुरूच; आता ‘या’ कारखान्याच्या विक्री व्यवहाराची होणार चौकशी
- पतीच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा ‘या’ कारणासाठी फेसबूक लाईव्हद्वारे येणार समोर
- ‘प्रताप सरनाईक यांच्या कामाशी स्पर्धा करा’ ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
