🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल सुरू करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसात या मोहिमेत २९ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. ११ हजार ५७० जणांनी पहिला तर १८ हजार २७९ जणांनी दुसरा डोस घेतला असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेला १० लाख ५५ हजार ६०० एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत नऊ लाख ९ हजार ३६१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या सात लाख ७६ हजार ४१० एवढी तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या तीन लाख ३२ हजार ९५१ एवढी आहे. शहराच्या काही भागात लसीकरणाला अद्याप प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे.
दरम्यान लसीकरणाची गती वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील अनेक खासगी रुग्णालयात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोहिमेत गेल्या सात दिवसात २९ हजार ८४९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. ११ हजार ५७० जणांनी पहिला तर १८ हजार २७९ जणांनी दुसरा डोस घेतला असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
चाचण्यांची संख्या घटली
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यामुळे शहरातील चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. महापालिकेने गुरुवारी (दि. १४) दिलेल्या अहवालानुसार चाचणी केंद्रावर केवळ ११८ एवढ्या चाचण्या झाल्या. त्यात १०५ आरटीपीसीआर तर १३ ॲन्टीजेन चाचण्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ आत्महत्याग्रस्त कुटुंबाला माजी मंत्री आ.संजय राठोड यांच्याकडून आर्थिक मदत
- मांसाहार प्रेमींनी करावा लागणार महागाईचा सामना; चिकन-मटणच्या दरात वाढ
- ‘उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं’, कांचन गिरींचा हल्लाबोल
- कोरोनामुळे शिर्डीच्या साई मंदिरातील दर्शन व्यवस्था सध्या तरी ऑनलाइनच
- ‘शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही’, उर्जामंत्र्यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
