Share

मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी लाखो रुपयांची थकवली पाणीपट्टी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची 24 लाख 56 हजार 469 रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे.

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयलस्टोन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा पुरातन, मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा शिवगिरी.

तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदनवन, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जेतवन, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा चित्रकुट, मंत्री राजेश शिंगणे यांचा सातपुडा, नवाब मलिक यांचा मुक्तागिरी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा रामटेक आणि सभापती रामराजे निंबाळकर यांचा अजंता तसेच सह्याद्री अतिथी गृहाची पाणीपट्टी थकली आहे. या सर्व बंगल्यांची एकूण पाणीपट्टी 24 लाख 56 हजार 469 रुपये एवढी असल्याने पालिकेने त्यांना डिफॉल्टरच्या यादीत टाकले आहे.

दरम्यान, सामान्य मुंबईकरांनी पाणीपट्टी थकवली तर त्यांचे पाणी कापले जाते. त्यामुळे महापालिका मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरही अशीच कारवाई करणार का? असा सवाल केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!