Share

‘कंदहार विमान अपहरण प्रकरणात ममतादीदी बंधक होण्यास तयार होत्या’

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.

आता, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘कंदहार अपहरण प्रकरणात ममता बॅनर्जी स्वत:ची कुर्बानी द्यायला तयार होत्या. प्रवाशांची सुटका होत असेल तर मला अतिरेक्यांकडे ओलीस म्हणून पाठवा, असा प्रस्तावच ममता यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमोर ठेवला होता,’ असा दावा वाजपेयी सरकारमधील मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

‘इंडियन एअरलाईन्सचं विमान अपहरण करुन कंदहारमध्ये नेण्यात आलं होतं. या विषयावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी स्वत:ला अतिरेक्यांच्या ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती. अतिरेक्यांनी सर्व प्रवाशांची सुटका करावी, त्याबदल्यात ममतांची अतिरेक्यांच्या ताब्यात जाण्याची आणि त्यानंतरच्या सर्व परिणांमांना सामोरे जाण्याची तयारी होती, अशी अट अतिरेक्यांना घालण्यासही त्यांनी सांगितलं होतं.’ असा गौप्यस्फोट यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

दरम्यान, ‘देशासाठी जी काही कुर्बानी देता येईल ती द्यायला मी तयार आहे, असंही ममतादीदींनी सांगितलं होतं,’ असा दावा कोलकात्यात टीएमसीचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर मीडियाशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!