अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सद्याच्या परिस्थितीपासून ते भ्रष्टाचारावर अटकावायापर्यंत अनेक बाबींवर भाष्य केलं. त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर देखील टीकास्त्र देखील सोडलं आहे.
चित्रपटगृह उघडली, रेल्वे सुरु केली पण मंदिर का उघडली नाहीत? असा सवालंही अण्णांनी राज्य सरकारला केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी आहे. थांबला तर खटारा, अशी बोचरी टीका महाविकास आघाडीच्या सरकारवर करत अण्णांनी लक्ष्य केलं.
तर, लोकपालनंतर लोकायुक्त कायदा करायचा आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता इतर मंत्र्यांकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनीही कोरोनानंतर याबाबत पावले उचलू असे सांगितले. दरम्यान, लोकायुक्त कायदा न झाल्यास पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार : थोरात
- माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर अन्याय होत आहे – अर्णब गोस्वामी
- मी समाजाला तोडणार नाही, तर जोडणार आहे- बायडेन
- भारतीय वंशाची महिला अमेरिकन उपराष्ट्रपती होणार; जाणून घ्या या महिलेबद्दल
- मुख्यमंत्री ठाकरे आज दुपारी जनतेशी साधणार संवाद!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

