पुणे: राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. फक्त इतकेच नाही तर मलिक यांच्या सुटकेसाठी निदर्शनेही काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘नवाब मलिक यांची पाठराखण करणं म्हणजे ९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असणाऱ्या दाऊद आणि इतर गुन्हेगारांचं समर्थन करणं. संजय राठोड यांच्या वेळेस भाजपने आंदोलन केल्यावर तात्काळ त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. जर शिवसेनेच्या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला जातो, तर मग राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही? याचा शिवसेनेच्या नेत्यांनी विचार करावा’, असे पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
“… त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे पर्यायच राहिला नाही”, संभाजीराजेंची प्रतिक्रिया
-
“मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याची परवानगी मविआ सरकारला कोणी दिली?”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
-
‘सुडाचं राजकारण कुठवर करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न’ अजित पवारांचा अप्रत्यक्ष टोला
-
“लवकरात लवकर मदत पाठवा”, राहुल गांधींनी पोस्ट केला ‘तो’ व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
