मुंबई: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील (N.D. Patil) यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.
एन.डी. पाटील यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते.
"शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 17, 2022
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
‘आयत्या पिठावर रेघोट्या…’; पवारांच्या मेट्रो ट्रायलनंतर चंद्रकांत पाटलांची टीका
‘मराठा आरक्षणाचा सरकारने लवकरात लवकर विचार करावा, अन्यथा…’; खासदार संभाजी राजेंचा इशारा
शाळा बंदच्या निर्णयाचा ‘ठाकरे’ सरकारने फेरविचार करावा; आमदार सतिश चव्हाणांची मागणी!
Bigg Boss 15 : काय सांगता! बिचुकलेनं दिला ६ तासांचा किसिंग सीन?


