Share

महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेचा किती बोजवारा उडाला आहे त्याचा ‘हा’ उत्तम नमुना- अतुल भातखळकर

Published On: 

मुंबई: कोरोनाचा फटका आरोग्यव्यवस्थेमधील विविध यंत्रणांना बसला असतानाच आता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वांत जास्त रक्त वाया गेले असून, महाराष्ट्राचा नंबर यात अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनासंसर्गामुळे देशात २०२० मध्ये तीन लाख ४३ हजार ७८३ युनिट रक्त वाया गेले असून, राज्यात हे रक्त वाया जाण्याचे प्रमाण १५ टक्के म्हणजे ५२ हजार ३६४ युनिट होते. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधत टीका केली आहे.

कोरोना काळात रक्त वाया घालवण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेचा किती बोजवारा उडाला आहे त्याचा हा उत्तम नमुना आहे. तुमचे रक्तदान तुमची जबाबदारी. अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. असे ट्वीट करत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान रक्त वाया जाण्यात पश्चिम बंगालचा दुसरा क्रमांक लागतो. येथे ४५ हजार ८७२ युनिट रक्त वाया गेले असून, तामिळनाडू तिसऱ्या क्रमाकांवर आहे. येथे ४४ हजार ५५७ युनिट रक्त वाया गेले. या तिन्ही राज्यांमध्ये रक्त वाया जाण्याचे प्रमाण ४१.५ टक्के असल्याची माहिती केंद्र सरकारच्या डीजीएचएस विभागाने दिली आहे. रक्त मुदतबाह्य होण्याचा कालावधी हा ३५ दिवसांचा असतो. मात्र या कालावधीमध्ये रक्त वापरले गेले नाही तर त्यामध्ये काही घटकांचा समावेश करून हा कालावधी ४२ दिवसांपर्यंत नेता येतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!