मुंबई – महाराष्ट्र राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक केले. गर्दीला अटकाव घालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आज रात्री आठ वाजल्यापासून येत्या 1 मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील. जीवनावश्यक वस्तू, फळे, भाजीपाला आदीची दुकानं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरु राहतील.
दरम्यान, नव्या नियमावलीनुसार, लग्न सोहळ्यांना केवळ 25 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. एवढंच नाहीतर विवाह सोहळा केवळ दोन तासांत आटपावा लागणार आहे. तसेच लग्नसोहळ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन झालं तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या किंवा नियमांचा भंग करणाऱ्या कुटुंबांना पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.
संबंधित कार्यालय किंवा समारंभस्थळावरही कारवाई करण्यात येणार आहे. कार्यालयानं नियमभंग केल्यास कोरोना आपत्ती असेपर्यंत कार्यालय बंद करण्यात येईल. दरम्यान, आधी लग्नसोहळ्यांसाठी 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा होती. पण आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ 25 जणांच्या उपस्थितीच लग्नसोहळा उरकावा लागणार आहे.
दरम्यान, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था,महानगरपालिकांची परिवहन सेवा, रिक्षा या सारख्या सेवाही सुरु असतील. मुंबईतील रेल्वे सेवासुद्धा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि तात्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठीच सुरु राहील. खासगी वाहनंसुद्धा पन्नास टक्के क्षमतेनं चालवता येतील. मात्र फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांचा वापर करता येईल. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही केवळ नातेवाईकांचं आजारपण किंवा अंत्यसंस्कार या कारणांसाठीच दुसऱ्या शहरात जाता येईल. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
- नांदेड जिल्ह्यात कोविड सेंटरमध्ये चाकूचा धाक दाखवत गोंधळ
- इयोन मॉर्गनला एका पाठोपाठ दोन झटके ; सामनाही गमावला आणि…
- विजयानंतर दिल्लीच्या आवेश खानने रोहित शर्माची भेट; रोहितकडून घेतली ‘ही’ खास भेट
- कोरोना अलर्ट! नांदेड जिल्ह्यात १३७२ नवे बाधीत, २५ जणांचा मृत्यू
- पॅट कमिन्सने चेन्नईच्या तोंडचे पाणी पळवले ; षटकारासह पडला चौकाराचा पाऊस


