टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर अनेक नेते भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांच्या संपर्कात आहेत. यावरून शिवसेनचे खा. संजय राऊत यांनी महाजन हे महान नेते आहेत, असा उपरोधिक टोला लगावला आहे.
निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करत आहेत. असे पक्षांतर लोकसभा निवडणुकीला देखील पाहिला मिळाले. त्यामुळे आता निवडणुका येताचं इतर पक्षातील नेत्यांनी भाजपकडे मोर्चा वळवणे हे काही नवीन नाही. मात्र आता या पक्षांतरावरून शिवसेना आणि भाजपमध्ये टोलेबाजी पाहिला मिळत आहे. भाजप नेत्यांकडून अनेकदा इतर पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला जातो. तर हा दावा खासकरून गिरीश महाजन हे वारंवार करत असतात. यावरून संजय राऊतांनी चांगलीचं टोलेबाजी केली आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकांना आता काही काळ शिल्लक राहिला आहे. मात्र त्या पूर्वीच काँग्रेस – राष्ट्रवादी पक्ष खिळखिळा झाला आहे. सत्ता असताना केलेले घोटाळे झाकण्यासाठी आणि आपल्यावर कोणत्याही चौकशीची टांगती तलवार असू नये, यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अनेक नेते काही दिवसातचं भाजपात प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले, गणेश नाईक, या धुरंधर नेत्यांची नाव देखील भाजप प्रवेशासाठी चर्चेत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

