नाशिक : आज सकाळी राज्यात 9 वाजून 50 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. नाशिक तसेच पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचा हादरा जाणवला. याची तीव्रता 3.8 रिक्टर स्केल इतकी होती.
मागील काही महिन्यांपासून देशातील अनेक भागांमध्ये भूकंप झाल्याची बाब प्रकर्षानं पुढे येऊ लागली आहे. कमी जास्त तीव्रतेचे हे धक्के चिंता वाढवणारी बाबही ठरत आहे. असं असलं तरीही सुदैवानं आतापर्यंत यामध्ये कोणत्याही स्वरुपाची जिवीत अथवा वित्त हानी झालेली नाही.
दरम्यान, शुक्रवारी रात्री सुमारे 11.41 वाजता देखील नाशिकमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.0 नोंदली गेली होती. . मात्र यामध्ये जिवित किंवा वित्तहानीबाबत कोणतेही वृत्त नाही. भूकंपाची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
पत्रकारांच्या प्रश्नांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची बोलती बंद ?
‘पिंपरी-चिंचवड’चा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी अजित पवारांची नवी रणनीती?
तेलगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

