Share

साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार; राणेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून काल गुरुवारी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकले आहेत. काल सकाळपासून आयकर विभागाची पथके यावर तपास करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यावर भाष्य केले करत या कारवाया म्हणजे सूडबुद्धीचं राजकारण असल्याचं म्हणाले होते. त्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी पवार कुटुंबावर टीका केली आहे.

पवार कुटुंबाने हजारो शेतकऱ्यांना देशोधडीला लावले हे पुरावे सहित यंत्रणांकडे पोहोचलेलं आहे. हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले त्याची भरपाई पवार कुटुंबाला ह्याच जन्मात करावी लागेल, ही तर सुरुवात आहे. साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार, असं म्हणत निलेश राणेंनी पवार कुटुंबावर टीका केली.

55 सहकारी कारखान्यांचे खासगीकरण करून प्रायव्हेट कंपन्यां मार्फत कवडीमोल किमतीला कारखाने विकत घेतले आणि अजित पवार म्हणतात माझी चूक काय? स्व. बाळासाहेब म्हणाले होते पवारांचे खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतील, ते सिद्ध झाले, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!