टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून सर्वपक्षीयांनी प्रचारसभेचा धडाका लावला आहे. परंतु, प्रचारसभेत पुन्हा एकदा मोहम्मद अली जीना यांचे नाव आले आहे. भाजपाची साथ सोडत काँग्रेसवासी झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जीना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे वक्तव्य केले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत होते.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले कि, काँग्रेस हे कुटुंब महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी यांचे आहे. यांचा देशाच्या प्रगतीत आणि स्वातंत्र्यात मोठा वाटा आहे. म्हणूनच मी येथे (काँग्रेसमध्ये) आलो आहे. मी काँग्रेस पक्षात पुन्हा मागे जाण्यासाठी आलेलो नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
