औरंंगाबाद : शहर आणि परिसरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक ऊन आणि कमालीचा उकाडा जाणवत असताना रविवारी (दि.६) सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले. अन् काही वेळातच वातावरण पालटून विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. वीस मिनिटानंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पावसाने जवळपास तासभर शहराला धुवून काढले. जोरदार पावसामुळे शहराच्या विविध भागातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला होता. तर सखल भागात पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते.
गेल्या सात ते आठ दिवसांपासून औरंगाबाद शहर परिसरात एकसारखा पाऊस पडत आहे. केरळात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप आपल्याकडे पोहोचायला त्याला विलंब लागणार आहे. रविवारी दिवसभर आकाशात उन्हाचा आणि काळ्या ढगांचा लपंडाव सुरू होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाने शहर परिसरात हजेरी लावली होती. त्यानंतर कडक उन्ह पडले होते. सायंकाळच्या वेळी पाच वाजेनंतर शहरावर पुन्हा काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरूवात झाली. जवळपास तासभर कोसळत असलेल्या पावसाने अनेकांची चांगलिच फजिती केली होती.
अनेकांनी नाल्यावर अतिक्रमण करून अपार्टमेंट उभारल्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर पावसात वाहने बंद पडल्याने गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाहने ढकलतांना वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली होती. मनपाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीची कामे झाली असल्याचा दावा करण्यात आला असला तरी पहिल्याच पावसात त्याचे पितळ उघडे पडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत, गर्दी होणार नाही याची काळजी घ्या ‘
- मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान
- ‘संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा’
- ‘प्रशासन चालवताना आपण जनतेसाठी आहोत, हे लक्षात ठेवावं यासाठीच शिवस्वराज्य दिन’
- मराठा आरक्षणाबाबतच्या अजित पवारांच्या ‘त्या’ विधानात दांभिकपणा; चंद्रकांत पाटलांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

