मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील भरतीच्या परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच आहे. विविध पदांसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. यात वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, विविध संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळेत ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळ संपत नसल्याचे चित्र आहे. यामुळे आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापाताना दिसत आहे. विरोधी पक्ष भाजपाकडून ठाकरे सरकार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली जात आहे. परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे.
याच मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘२४ ऑक्टोंबरला परीक्षा आयोजित करून या परीक्षेच्या नियोजनातही आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजन अजूनही दिसून येत आहे. मला वाटतं की यांनी ठरवलं आहे, की जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ आणि अर्ध अर्ध वाटून खाऊ अस हे महाखाऊ सरकार आहे.’ अशी टीका त्यांनी केली आहे.
24 ऑक्टोबरला परीक्षा आयोजित करून या परीक्षेच्या नियोजनातही आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजन अजूनही दिसून येत आहे.
मला वाटतं की यांनी ठरवलं आहे, की जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ आणि अर्ध अर्ध वाटून खाऊ अस हे महाखाऊ सरकार आहे.@rajeshtope11 @OfficeofUT
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 19, 2021
तर ‘एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर. ‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’- आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेत दुसऱ्यांदा गोंधळ झालाय. थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा. नसेल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा’ अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लाजवाब..’सौंदर्याने उर्मिला कोठारेने केले घायाळ
- सोनपेठमधील ‘त्या’ इमारत प्रकरणी गुन्हे नोंदवा, आमदार बाबाजानी दुर्राणी यांची मागणी
- भारतीय सैन्याकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा
- अजिंठा खोऱ्यात नव्या सिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव दिवाळीपूर्वी सादर करा, अब्दुल सत्तारांचे निर्देश
- पीकनुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका; आ. बंब यांचा अधिकाऱ्यांना इशारा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

