Share

शासनाकडे पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मिळवून देऊ : सुभाष देशमुख

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर (प्रतिनिधी)- दक्षिण आणि उत्तर तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना शासनाकडे पाठपुरावा करुन त्वरित नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही आ. सुभाष देशमुख यांनी देत ग्रामस्थांना धीर दिला. यावेळी आ. देशमुख यांनी  गावकऱ्यांची राहण्याची आणि खाण्याची त्वरित व्यवस्था करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

आ. देशमुख यांनी शुक्रवारी दक्षिण तालुक्यातील चंद्राळ, उत्तर तालुक्यातील तिर्हे, शिवणी, तेलगाव, पाकणी, नंदूरसह इतर भागात जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार अमोल कुंभार, हत्तूरचे सरपंच धर्मा राठोड, प्रशांत सलगर, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या भागात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. अनेक महिलांना शेताचे नुकसान झाल्याचे सांगताना अश्रू अनावर झाले होते. यावेळी आ. देशमुख यांनी महिलांना धीर देत शासनाकडे पाठपुरावा करून मदत देण्याचे आश्वासन दिले.

चंद्राळ गावातील ग्रामस्थांची व्यवस्था हत्तूर येथील जि.प. शाळेत करून त्यांची जेवण्याची, पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले तसेच झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यासही अधिकाऱ्यांना सांगितले. याशिवाय आ. देशमुख यांच्या सूचनेनुसार बचाव कार्यासाठी महसूल, पोलिस विभागाची पथके आणि एनडीआरएफची टीम विविध भागात पाठवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!