टीम महाराष्ट्र देशा : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांची २ लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जे माफ केली जाणार असल्याचे त्यांनी विधानसभेत जाहीर केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली पीक कर्जमाफी कोणत्याही अटींशिवाय असेल, अशी माहिती या वेळी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जाणून घ्या कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी
राज्यातील छोटे- मोठे सर्व शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं आहे, ते सर्व शेतकरी पात्र
ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज म्हणून कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज माफ होईल.
ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल, त्यांचं दोन लाखापर्यंतचंच कर्ज माफ होईल.
शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी मिळेल.
कर्जमाफीसाठी कोणालाही फॉर्म भरायची गरज नाही.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.
आधार लिंक असलेल्या खात्यात थेट कर्जमाफी मिळणार.
मार्च 2020 पासून महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरु.
मंत्री, आमदार, शासकीय कर्मचारी सोडून सर्वांना कर्जमाफी मिळणार.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पात्र असणार.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1208674851369566208?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1208672334736805888?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

