Share

‘महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पैसे खाण्याचेही कौशल्य नाही’; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आघाडी सरकारमध्ये पैसे खान्याशिवाय कुणालाच काही कळत नाही. पैसे खाताना म्हणजे दरोडा घालताना जे कौशल्य लागतं नां, ते कौशल्यही यांच्याकडे नाही. कुठल्याही कामात सरकारमध्ये समन्वय नाही. एकमेकांचे हिशेब चुकते करण्यावरच यांचा भर आहे. अशी खोचक टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर केली.

चंद्रकांत पाटील पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते, यावेळी ते म्हणाले आघाडी सरकारमध्ये पैशे खाण्याशिवाय कुणालाच काही कळत नाही. पैशे खाताना म्हणजे दरोडा घालताना जे कौशल्य लागतं नां, ते कौशल्यही यांच्याकडे नाही. असा चिमटाही त्यांनी आघाडी सरकारला काढला.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, एखादी गोष्ट करताना तीचा पुरावा मागे कशाला सोडता पुढे कोर्टात चॅलेंज केले जाणार आहे, कोर्ट हाणणार आहे, याची कुणालाच काळजी नाही. त्यामुळे बेभरोशी सरकार झाले आहे. मी कुठलीही अँबीशन नसलेला सामाजिक कार्यकर्ता आहे. मी आता चिंतेत आहे, तुमचे कमिशनर बेपत्ता आहेत. तुमचे डझनभर अधिकारी जेलमध्ये आहेत. ज्या मुंबई पोलिसांची पूर्ण जगामध्ये वाह वा असायची त्या पोलीस आयुक्तालाच तुम्ही बेपत्ता होण्यास भाग पाडलं. सगळच बेभरवशी कारभार चालू आहे. या सरकारमुळे गेल्या १९ महिन्यांत राज्यातील सर्व व्यवस्था कोलमडवल्या आहेत. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!