Share

स्मार्ट योजनेच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये लातूर जिल्हा राज्यात अव्वल

Published On: 

🕒 1 min read

लातूर :- राज्य शासनाने सन 2020-21 मध्ये बाळासाहेब ठाकरे कृषि व ग्रामीण परिवर्तन योजना राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी  गट व महिला गट यांना लाभ होणार आहे.

या सुवर्ण संधीचा पुरेपुर लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देवून त्यांचा परिपूर्ण विकास व परिवर्तन करण्याचा उदात्त हेतुने आत्मा व कृषि विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन प्रपत्रे भरण्याच्या शासनस्तरावरुन सुचना होत्या.

विशेष म्हणजे कोरोना काळात सुध्दा मागील आठ दिवसांपासून जिल्हयातील कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी हे शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट यांचे अर्ज दररोज रात्री 10.30 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करुन 754 प्रस्ताव सादर केले.

त्यांच्या या भरीव कामगीरीमुळे लातूर जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामांसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस.गावसाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प उपसंचालक आत्मा आर.एस.पाटील व बी.पी.किरवले तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांनी आहोरात्र राबून हा उद्देश साध्य केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!