Share

‘मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचे फोन न उचलनारा मध्यरात्री एका मेसेजचं उत्तर देतो हे अतिशयोक्ती आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला फोन केला. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन मला या वर्षीची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे, असं मुख्यमंत्री नांगरे पाटील यांना म्हणाले. नांगरे पाटलांनी खास फेसबुक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांच्या फोनबद्दलचा खास अनुभव शेअर केला आहे.

मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. सुखद धक्का देणारा मा.मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो, असं मुख्यमंत्री फोनवर म्हणाल्याचं नांगरे पाटलांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विश्वास नांगरे पाटील यांच्यातील 31 डिसेंबर रोजी रात्री झालेल्या संभाषणाची बातमी सर्व माध्यमांत प्रकाशित होत असतानाच भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. काय बातमी पेरली आहे… हे मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचे फोन उचलत नाही, शिवसैनिकांना फाट्यावर मारतात ती व्यक्ती मध्यरात्री एका मेसेजचं उत्तर देते हे अतिशयोक्ती आहे. PR टीमने कितीही उचलून धरलं तरी लोकं दूध खुळी नाही, आणि केलं जरी असेल तरी ते त्यांचं काम आहे, महाराष्ट्रावर उपकार नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!