लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, प्रशासन नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना देत असले तरी मात्र नागरिक त्यांना प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या तहसीलदारानी स्वतः रस्त्यावर उतरत नागरिकांवर कारवाई केली. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून एका दिवसात सुमारे २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिरूर अनंतपाळ तहसीलचे तहसीलदार अतुल जटाळे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व नगरपंचायतीचे कर्मचारी शुक्ररवारी सकाळपासून शहरातील बसवेश्वर चौकात विना मास्क शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ९५ टक्के नागरिकांनी मास्कचा वापर केल्याचे पथकास दिसून आले.
शहरात ९५ टक्के नागरिक मास्कचा वापर करत आहेत व सोशल डिस्टंसचे पालन करीत आहेत. त्या बरोबरच शहरातील केवळ मेडीकल व किराणा दुकाने चालु आहेत. जर कोणी नियमाचे उल्लंगन करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिला आहे. त्या बरोबर शनिवार व रविवार हे दोन दिवस शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवावे, आवाहन तहसीलदार अतुल जटाळे यांनी नागरीकांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’
- आम्ही आतंकवादी नाही, आमचा हक्क मागायला आलोय – निलेश राणे
- कोरोना निर्बंध आणखी कडक करण्याची तयारी, सर्वपक्षीय बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- मॅक्सवेलचा तुफान षटकार पाहून कोहली हैराण : पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

