मुंबई – शेतकरी आंदोलन हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न असून बाहेरील लोकांनी यावर ढवळाढवळ करू नये. आमच्या देशाचे प्रश्न सोडवण्यात सरकार समर्थ आहे, अशा आशयाचे ट्विट भारतीय सेलेब्रिटी आणि खेळाडूंकडून करण्यात आले होते.आता शेतकरी आंदोलनावरून अनेक सेलिब्रेटींनी केलेल्या ट्विट्सची चौकशी करण्याचे आदेश, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
देशाबाहेरील कलाकारांनी या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींच्या एका गटाने देशातील एकटा जपणं महत्वाचं असल्याचं म्हणत बाहेरच्या सेलिब्रिटींनी यात नाक खुपसू नये अशी समज दिली होती.
दरम्यान, हे ट्विट भीतीच्या छायेत केले असून यासंबधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्र्यांकडे केली. सावंत यांनी वर्चुअल पद्धतीने गृहमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी ट्विट्सची चौकशी करण्यात येईल, अशी आश्वासन त्यांनी दिले.भारतरत्न सचिन तेंडुलकर, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेते अक्षय कुमार, अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांचा समावेश आहे. मात्र, हे ट्विट सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी भाजप सरकारच्या दबावापोटी केले असल्याचा संशय सचिन सावंत यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, ज्या दिग्गज सेलिब्रिटींनी हे ट्विटस केले त्यांच्यावर खरंच कुणी दबाव टाकू शकेल का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.ज्यांनी कुणी दबाव टाकल्याचा आरोप सावंत करत आहेत त्या लोकांसोबत विदेशातील सेलिब्रिटींना खडेबोल सुनावणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची पण चौकशी आता महाराष्ट्र सरकार करणार आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. जर या सेलिब्रिटींची चौकशी होणार असेल तर कृषी कायद्यांच्या विरोधात ज्या सेलिब्रिटींनी ट्विटस केले त्यांचीही चौकशी करण्याची हिम्मत राज्य सरकार दाखवणार का ?असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

