Share

लखीमपूर हिंसाचाराची तुलना ‘जालियनवाला’शी; फडणवीस म्हणाले, ‘राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी…’

Published On: 

मुंबई : उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी उत्तर प्रदेश आणि मोदी सरकारवर जोरदार टीका सत्र सुरु केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जलियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लखीमपूरची ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, देशातील शेतकरी या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील, असे पवार म्हणाले. पीडितांच्या नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या विरोधकांनाही सरकार अडवत आहे. या सरकारकडून लोकशाहीची हत्या सुरू आहे. पण आम्ही विरोधक शेतकऱ्यांचा सोबत आहोत’, असं शरदosbs पवार म्हणाले आहेत.

सर्वच पक्ष आता या प्रकरणाला पुढं करुन आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळी वक्तव्य करत आहे. दुर्दैव हे घटनेपेक्षा त्याचं राजकारण हे आहे, असं म्हणत फडणवीस म्हणाले आहेत.

अशा प्रकारचं राजकारण करुन काहीही मिळणार नाही. असा घटनेचे राजकारण करुन काही फायदा मिळेल असं वाटत असेल तर कितीही राजकारण केले तरी त्याचा फायदा मिळत नसतो, असं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!