🕒 1 min read
मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत असून काल एका दिवसात मुंबईत रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज(८ जाने.)मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी बीकेसी कोविड सेंटरची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेवर उत्तरही दिले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना किरीट सोमय्या यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लॉकडाऊन या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला होता. ते म्हणाले होते की,’काही सत्ताधारी नेते स्वत:चे राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट,लॉकडाऊन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे’, असे सोमय्या म्हणाले होते.
दरम्यान, सोमय्या यांच्या टीकेवर आता किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले असून यासंदर्भात बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते. परंतु परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे’, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया;म्हणाले…
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- वृद्ध शेतकऱ्याने कानशिलात लगावल्यानंतर ‘त्या’ भाजप आमदाराने दिले स्पष्टीकरण
- “पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…”
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध’, भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
